Monday, 20 July 2020

शैक्षणिक विषमता वाढवणारा वर्ल्ड बँकेचा ‘स्टार’ प्रकल्प


द वायर मराठी

शैक्षणिक विषमता वाढवणारा वर्ल्ड बँकेचा स्टारप्रकल्प

जागतिक बँकेचा स्टारप्रकल्प भारतीय शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीच्या मूलभूत समस्येच्या खोलात न जाता, वरवरचे उपाय करत आहे. संविधान विरोधी, शैक्षणिक विषमता वाढविणारा व भारतीय शिक्षणाला जागतिक भांडवलशाहीचे गुलाम करणारा हा प्रकल्प आहे.
भारताच्या पंतप्रधानांनी नुकताच भारतीयांना आत्मनिर्भर भारताचासंदेश दिला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारत हा जगाचा महागुरुहोईल असेही म्हटले होते! परंतु आता असे दिसून येत आहे की, भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी व महागुरु होण्यासाठी, जागतिक बँकेच्या कर्जावर अवलंबून राहावे लागणार आहे.
भारतात शालेय शिक्षणासाठी जागतिक बँकेच्या कर्जावर Strengthening Teaching – Learning and Result for State Programme (STARS) हा प्रकल्प राबविला जाणार आहे. २४ जून २०२० रोजी जागतिक बँकेने एका प्रसिद्धी पत्रकात याची माहिती दिली आहे.
भारतात शालेय शिक्षणात पट नोंदणी वाढली आहे. २००४-२००५ मध्ये एकूण पट नोंदणी २१.९ कोटी होती. २०१८-१९ मध्ये ही संख्या २४.८ कोटीपर्यंत पोहोचली आहे. पटनोंदणी चांगली वाढली आहे पण शिक्षणाची गुणवत्ता मात्र घसरत आहे असे निरीक्षण अनेक अहवालांनी केले आहे. त्यामुळे शिक्षणात व सार्वजनिक शिक्षणात, सरकारी शाळांमध्ये गुणवत्तावाढ हा कळीचा प्रश्न झाला आहे! शिक्षण हक्क कायद्याचे सर्वांसाठी शिक्षणहे उद्दिष्ट लक्षात घेऊन व एकही विद्यार्थी मागे राहणार नाही हे पाहण्यासाठी शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हा प्रकल्प आहे.
या प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष यू.एस. डॉलर (रु. ३,७०० कोटी) कर्ज दिले जाईल. त्याची मुदत असेल १४.५ वर्षे. या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत,
·         शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे
·         अध्यापन व अध्ययन दर्जात सुधारणा घडविणे
·         शिक्षकांच्या सुप्त क्षमतांचा विकास घडविणे
·         शालेय शिक्षणाचा गव्हर्नन्स सुधारणे
·         श्रम बाजाराला आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास घडविणे
·         शिक्षण प्रक्रियेतील उपेक्षित घटक अ.जा., अ.ज., अल्पसंख्याक इ. घटक जो एकूण ५२ टक्के आहे, त्याच्यात कौशल्य विकास घडवून आणणे. त्यांचा शालेय शिक्षण ते श्रम बाजार हा प्रवास सोपा करणे.
·         मुलांच्या अध्ययनाच्या, शिक्षणाच्या प्रक्रिया परिणामकारक करणे, शालेय शिक्षणाशी जोडलेल्या घटकांच्या व प्रामुख्याने पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणे.
या प्रकल्पाचा फायदा २४ कोटी मुलांना (वयोगट ६-१७), १५ लाख शाळांना व १ कोटी शिक्षकांना होईल असे म्हटले गेले आहे. केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियाना मार्फत हा प्रकल्प राबविला जाईल. हा प्रकल्प सुरुवातीला ६ राज्यांत, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, ओडिसा व राजस्थान येथे अमलात येणार आहे. या प्रकल्पाला जागतिक बँक १५% व भारत सरकार व राज्य सरकारे एकत्रत ८५% गुंतवणूक करणार आहेत; परंतु स्टार प्रकल्पाचे नियोजन व नियंत्रण जागतिक बँकेकडे असेल.
या नव्या स्टारप्रकल्पाच्या आधी, जागतिक बँकेच्या मदतीने १९९३-२००४ या काळात जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प’ (डी.पी.ई.पी.) ६ ते १४ वयोगटासाठी भारतात राबविला गेला होता. ३१० दशलक्ष अमेरिकी डॉलरची मदत जागतिक बँकेने भारताला दिली होती. भारतातील निवडक व मागासलेल्या २१० जिल्ह्यांत शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला होता.
याची प्रमुख वैशिष्ट्ये होती, शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, पाठ्यपुस्तके सुधारणे, गळतीची टक्केवारी कमी करणे, मुलामुलींच्या शाळा भरती, शाळेत टिकणे, शिक्षणाचे आकलन इ. मध्ये जो फरक आहे तो कमी करणे, निरनिराळ्या सामाजिक घटकांमध्ये जो शिक्षणाच्या प्रगतीत फरक आहे तो कमी करणे इ.
प्रकल्प चालू असताना व प्रकल्प पूर्ण झाल्यावर याचे मूल्यमापन केले गेले होते. जागतिक बँकेने केंद्र सरकारला हा प्रकल्प राबविला म्हणून प्रशस्तपत्रक दिले असले तरी स्वतंत्रपणे या प्रकल्पाचा अभ्यास करणार्यांनी या प्रकल्पाच्या अनेक त्रुटींबद्दल लक्ष वेधले आहे. एन.सी.ई.आर.टी.चे माजी संचालक कृष्ण कुमार यांनी असे मत नोंदविले आहे की, ‘‘डी.पी.ई.पी.मुळे भारतीय शिक्षणव्यवस्थेत काही चुकीचे पायंडे पडले आहेत. उदा. कंत्राटी शिक्षक हा प्रकार शिक्षणव्यवस्थेत आला आहे, कायम शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेला अडथळा आहे असा गैरसमज निर्माण करण्यात आला आहे. जोन्सा जालान, कलकत्ता व इलना (जागतिक बँक, वॉशिंग्टन) यांनी असे स्पष्ट मत नोंदविले आहे की, ‘‘या प्रकल्पाचा परिणाम फार अल्प झाला आहे. एकूण नक्त अंतिम यश फार मिळालेले नाही. पटसंख्या वाढणे, जेंडर गॅप कमी होणे, गळती कमी होणे इ. फार घडलेले नाही. डी.पी.ई.पी. प्रकल्पाचे जिल्हे व हा प्रकल्प नसलेले शेजारचे जिल्हे यांच्या शैक्षणिक परिस्थितीत फार फरक असलेला दिसत नाही.’’ या प्रकल्पाने भारतीय शिक्षणाचे विकृतीकरण केले आहे ते असे आहे.
·         सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण औपचारिक शिक्षणाची हमी देण्याऐवजी ब्रिज कोर्सवैकल्पिक शिक्षण असे अनौपचारिक शिक्षणाचे नवे पर्याय गरीब मुलांसाठी तयार केले गेले व शिक्षणात स्तरीकरण वाढविले गेले आहे.
·         पॅरा शिक्षकांच्या योजना आणल्या गेल्या आहेत.
·         शिक्षणाचे उद्दिष्ट सर्वांगण शिक्षणाऐवजी’ ‘साक्षरतेवरभर असे करण्यात आले आहे.
·         शिक्षणावर आंतरराष्ट्रीय नियोजन व नियंत्रण वाढविले गेले आहे.
·         शिक्षणाची, सरकारची घटनादत्त जबाबदारी असूनही शिक्षणाचे एन.जी.ओ.करण करण्यावर भर देण्यात आला आहे.
·         या योजनेचे खरे उद्दिष्ट, वरील विकृती आणून, शासकीय शाळांचा दर्जा घसरविणे व अंतिमतः खाजगी, नफेखोरी करणार्या शाळांना विद्यार्थी पुरविणे हेच होते. हा प्रकल्प संपल्यापासून गेली १५ वर्षे आपण याचा अनुभव घेत आहोत.
हा जागतिक बँकेच्या डी.पी.ई.पी.चा अनुभव पाठीशी असताना आता नवा स्टारप्रकल्प भारतात येऊ घातला आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था जरी आकर्षक उदारतेची, मानवतेची भाषा करत असले तरी, अंतिमतः या संस्था आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीच्या प्रतिनिधी आहेत व शेवटी या भांडवलशाहीचे हितसंबंध जपणे हेच यांचे उद्दिष्ट आहे म्हणून डी.पी.ई.पी. योजनेत शिक्षण म्हणजे साक्षरताअसे समीकरण मांडले गेले होते. तर स्टारप्रकल्पात एक पाऊल पुढे टाकून शिक्षण म्हणजे कौशल्य विकासअसे समीकरण मांडले गेले आहे. या संदर्भात थ्री इडियटया सिनेमात अमीर खानचा एक छान संवाद आहे, आय.आय.टी.च्या विद्यार्थ्यांना तो म्हणतो की, ‘सर्कशीमध्ये छडीच्या धाकानी सिंह उडी मारून खुर्चीत बसायला शिकतो, त्याला आपण उत्तम प्रशिक्षितम्हणतो, ‘उत्तम शिक्षितम्हणत नाही!
शिक्षणाचा उद्देश स्वतंत्र विचाराचा, नवनिमिर्ती करणारा, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील, श्रम प्रतिष्ठा मानणारा, मानवी मूल्ये जपणारा नागरिक घडविणे हे आहे अशी भूमिका म.गांधी, जे.पी.नाईक, जे. कृष्णमूर्ती इ. अनेकांनी घेतली आहे. त्या दृष्टीने संविधानाच्या मूल्यांवर आधारित दहा गाभातत्वे एन.सी.ई.आर.टी. ने निश्चित केली होती. त्यात श्रमप्रतिष्ठा हे मूल्य अंतर्भूत केलेले आहे. कोठारी आयोगाने सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. कौशल्य विकास नसावा असे कोणी म्हणत नाही. म. गांधींनी बुनियादी तालीममध्ये हाताने केलेले काम हेच शिक्षणाचे माध्यम आहे असे म्हटले आहे व हे काम प्रत्येकाने करावे असे बुनियादी तालीमचे उद्दिष्ट आहे. म. फुल्यांनी १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या निवेदनात व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व मानलेले आहे व त्याचा आग्रह त्यांनी ब्रिटिश सरकारकडे धरला होता.
भारतात १९व्या व २०व्या शतकातील कौशल्य शिक्षणाचा चिंतनावर बोळा फिरवून, शिक्षण म्हणजे केवळ कौशल्य विकास अशी भूमिका स्टारप्रकल्प घेत आहे. हा कौशल्य विकास प्रामुख्याने श्रम बाजाराच्या गरजा भागविण्यासाठीच आहे ! भारतातील शिक्षणव्यवस्था म्हणजे जागतिक भांडवलदारांच्या कुशल मनुष्यबळाच्या गरजा भागविण्याचे साधन आहे अशी भूमिका जागतिक बँकेने घेतली आहे. अभ्यासक्रमासाठी दहा गाभा तत्वे बाजूला सारुन, कौशल्य विकासावर अवाजवी भर देण्याची प्रक्रिया १९९० पासून जागतिकीकरणापासून सुरु झाली आहे. भारतातील बेरोजगारीचे कारण काय तर मुलांना कौशल्य शिक्षण नाही, असे उथळ, सुलभीकरण बेकारीच्या समस्येचे केले गेले आहे.
त्यामुळे स्वतंत्र विचार न करणारा, प्रश्न न विचारणारा, आत्मकेंद्रित व चंगळवादाच्या मागे धावणारा कुशल मजूर व्यवस्थेला हवा असतो. राज्यकर्त्यांना सुद्धा असेच तरुण हवे असतात. म्हणून शिक्षणाचे उद्दिष्टच बदलण्याची प्रक्रिया जागतिकीकरणाच्या धोरणापासून सुरू करण्यात आली आहे व जागतिक बँकेचा स्टारप्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे.
शिक्षणात उपेक्षित असणार्या अ.जा., अ.ज., अल्पसंख्यांक समाजाच्या मुलांकडे जास्त लक्ष देणे व त्यांना कौशल्य देऊन श्रम बाजारासाठी तयार करणे हे एक उद्दिष्ट स्टार प्रकल्पाचे आहे. सामाजिकदृष्ट्या उपेक्षित घटकांना उच्च शिक्षणाची दारे उघडून देण्याऐवजी त्यांना कौशल्य देऊन श्रम बाजारात पोहोचवणे म्हणजे जुन्या जातीव्यवस्थेची श्रम विभागणी नव्या स्वरुपात आणण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे खाजगी महागड्या शाळेत जाणार्या आर्थिक व सामाजिक उच्च वर्गातल्या मुलांनी उच्च शिक्षणात जावे व सरकारी शाळेत जाणार्या मुलांनी शारीरीक कष्टाच्या कामाकडे जावे ही जुनी विषमता, नव्या प्रकारे कायम ठेवण्यासाठी ही योजना आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
भारताच्या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता घसरत आहे, हे वास्तव आहे. शालेय शिक्षणाच्या संदर्भात, ‘असरचे अहवाल व उच्च शिक्षणाच्या संदर्भात फिकीच्या अहवालात हे अधोरेखित झाले आहे. शिक्षणात गुणवत्ता सुधारली पाहिजे हे सत्य आहे व गुणवत्ता घसरण्याच्या सर्व कारणांची चर्चा होऊन, सर्व बाजूने उपाययोजना झाली पाहिजे पण केवळ अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत सुधारणा म्हणजे गुणवत्ता सुधार असे समजणे, प्रश्नाचे सुलभीकरण असे आहे. भांडवलशाही व्यवस्था प्रश्नांना सोपी उत्तरे शोधते तसाच प्रकार स्टारप्रकल्पात करण्यात आला आहे.
भारतात केंद्र व राज्य सरकारांचा शिक्षण हा अग्रक्रमाचा विषय नाही. केंद्रात, मौ.आझाद, छागला यांच्या उंचीचा नंतर कोणीही शिक्षण मंत्री झाला नाही व राज्यात मधुकरराव चौधरी यांच्या उंचीचा शिक्षणमंत्री झाला नाही. शिक्षण खाते, मलिदा खाते नसल्यामुळे, नाईलाजाने कोणीतरी शिक्षणमंत्री होतात. राज्यकर्त्यांच्या या दृष्टीकोनामुळेच शिक्षण उपेक्षित राहते आणि त्याचा परिपाक म्हणजे बजेटमधील शिक्षणाची तरतूद कमी कमी होत जाते.
गुणवत्तावाढीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करुन देणे ही शासनाची जबाबदारी आहे; पण शिक्षक-शिक्षकेतरांची रिक्त पदे भरण्यावर शासन यंत्रणा उपाय करायला तयार नाही. लोकसभा सचिवालयाच्या एका अहवालानुसार २०१५-१६ मध्ये भारतात प्राथमिक शिक्षणात ८,३३,९७७ पदे रिक्त होती. मंजूर पदांशी हे प्रमाण १६.०४ टक्के आहे तर माध्यमिक शिक्षणात रिक्त पदे, ,८२,८६८ होती व मंजूर पदांशी हे प्रमाण २१.२८ टक्के आहे म्हणजे भारतात आता शालेय विभागात १० लाख पदे रिक्त आहेत. तर दुसर्या बाजूला शिक्षणहक्क कायद्यातील विद्यार्थी-शिक्षक प्रमाणानुसार ११ लाख नवीन शिक्षक भरावे लागतील असे निवेदन कपिल सब्बल यांनी संसदेत केले होते. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी २१ लाख नवे शिक्षक भरावे लागतील.
शिक्षकांना शाळेत शिकविण्या व्यतिरीक्त जी इतर सरकारी कामे दिली जातात त्यामुळे शिक्षकांनी शाळेचे काम करायचे कधी असा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार आपत्कालीन कामे उदा. निवडणुकांचे काम हे शिक्षकांना बंधनकारक आहे व इतर कामे दिली जाऊ नयेत अशी तरतूद कायद्यामध्ये आहे. पण सध्या जनगणना व मतदार याद्या ही वर्षभर चालणारी कामे शिक्षकांकडून करुन घेतली जातात, म्हणून आम्हाला मुलांना शिकवू द्याअशी मागणी शिक्षकांनी शासनाकडे केली होती.
गुणवत्तावाढीसाठी किमान भौतिक सोयी, प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष इ. चांगल्या अवस्थेत व चालू अवस्थेत असायला हवेत. गुणवत्तावाढीसाठी ऑनलाईन शिक्षणाची चर्चा सध्या चालू आहे; पण विजेचा लपंडाव, लोडशेडींग, इंटरनेट संपर्कात अडथळे, इंटरनेटचे भाडे, पालकांचे जुने मोबाईल अशा अनंत अडचणींमुळे मुलांनी ई-शिक्षण कसे घ्यायचे याचे उत्तर सरकारकडे नाही.
स्टार योजनेप्रमाणे गुणवत्ता म्हणजे पिसाच्या (PISA- Programme For International Student Assessment) प्रमाणित परीक्षेसाठी मुलांची तयारी करून घेणे होय! यासारख्या परीक्षा युरोपातील ओ.ई.सी.डी. देशात, शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात! या साचेबद्ध व प्रमाणित परीक्षा व त्यातील यश म्हणजे गुणवत्ता असे नवे गुणवत्तेचे सूत्र यातून मांडले जाणार आहे. शिक्षणाचे व अध्यापनाचे उद्दिष्ट पिसासाठी मुलांना तयार करणे असा सीमित करण्याचा हा प्रयत्न आहे.
या तथाकथित गुणवत्ता सुधार कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, संघटना यांना सामील करून घेतले जाणार आहे. हा सार्वजनिक खाजगी सहकार्याच्या योजनेचा प्रकार आहे. सरकारी शिक्षणाच्या खाजगीकरणाची ही नांदी आहे.जागतिक बँक ही वित्त पुरवठा व बँकिंग क्षेत्रात काम करणारी वित्तीय संस्था आहे. शिक्षण हे त्यांच्या कार्याचा भाग नाही. युनिसेफ, युनेस्को यांच्या कार्याचे स्वरुप वेगळे आहे. जागतिक बँक शिक्षणात तज्ज्ञ नाही. त्यामुळे त्यांच्या योजनेची लोकसभेत व देशात चर्चा होणे ही लोकशाही देशाची गरज असते. अशा चर्चेची संधी न देणे, लोकशाहीची पायमल्ली आहे.एकूण जागतिक बँकेचा स्टारप्रकल्प भारतीय शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीच्या मूलभूत समस्येच्या खोलात न जाता, वरवरचे उपाय करत आहे. संविधान विरोधी, शैक्षणिक विषमता वाढविणारा व भारतीय शिक्षणाला जागतिक भांडवलशाहीचे गुलाम करणारा हा प्रकल्प आहे. या योजनेचा बिटवीन द लाईनअर्थ हाच आहे. म्हणून प्रथम याची चर्चा घडवून आणणे व तो नाकारणे गरजेचे आहे.
प्रा. शरद जावडेकर, अ.भा.समाजवादी शिक्षणहक्क सभा.


Sunday, 1 March 2020

९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


                                   अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
                                               ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


                                       अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
                                               ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार



अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार

                                        अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
                                               ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


                                   अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
                                               ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


                                        अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
                                               ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार


अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार

                                       अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
                                               ९ वे द्वैवार्षिक अधिवेशन , नंदुरबार
                                                                        उद्घाटन सोहळा 

Thursday, 2 January 2020

"राष्ट्रीय शिक्षा नीती २०१९" या विषयावर डॉ. अनिल सद्गोपाल यांचे व्याख्यान राष्ट्र सेवा दल आणि अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या सयुंक्त विद्यमाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आले होते .

डॉ. अनिल सद्गोपाल 
"राष्ट्रीय शिक्षा नीती २०१९" या विषयावर डॉ. अनिल सद्गोपाल यांचे व्याख्यानAdd caption
वर्षा गुप्ते , डॉ. शरद जावडेकर , डॉ. अनिल सद्गोपाल
महाराष्ट्र टाईम्स १ जानेवारी २०२० 

Friday, 29 November 2019

समाजवादी अध्यापक शिक्षण दिन व दिवाळी विशेषांक प्रकाशन, कोल्हापूर 
मा. सौ. वंदना काशीद, श्री. एम.एस. पाटोळे, श्री. हसनभाई देसाई, श्री. जिनरत्न रोटे , सौ, पल्लवीताई कोरगांवकर ,मा. अ‍ॅड. सौ. सूरमंजिरी राजेश लाटकर , महापौर , कोल्हापूर महानगरपालिका, डॉ. शरद जावडेकर, , श्री. बी बी मगदूम , श्री. संजीव पारीख 
शिक्षण दिन व दिवाळी विशेषांक २०१९ "महाराष्ट्रातील शिक्षणाचे वास्तव " प्रकाशन समारंभात सुरेखा खरे , श्री. मधुकर निरफराके, डॉ. रजिया पटेल, डॉ. शरद जावडेकर 

Sunday, 18 August 2019



डॉ. शरद जावडेकर, संघटक , अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा 

अध्यक्ष मा. डॉ. अभिजित वैद्य ,अध्यक्ष , आरोग्य सेना 


मा. श्री. विजय बहाळकर (शिक्षण लोकशाही आघाडी ) 
डॉ. सुरेंद्र जोंधळे , माजी विभाग प्रमुख, राज्य शास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ 


https://www.youtube.com/watch?v=NxEWMbMuoCg&t=48s


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ व आर्थिक बाजू  : डॉ. शरद जावडेकर , अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा पुणे ( विचारवेध )


https://www.youtube.com/watch?v=NxEWMbMuoCg&t=48s


Thursday, 4 April 2019

शिक्षण हक्क कायदा सुधारणा सत्याग्रह , पुणे २०१५ अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा
















शिक्षणाचा जाहीरनामा : सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणप्रेमी नागरिकांचा, शेतकरी, महिला, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्य, कष्टकरी वर्गाचा शिक्षणाचा जाहीरनामा.

शिक्षणाचा जाहीरनामा

कोणताही देश व समाज हा युद्धसाहित्याच्या जोरावर महासत्ता होत नाही. २१व्या शतकाचे वर्णन हे ज्ञानावर आधारित समाज, ज्ञान अर्थव्यवस्था, ज्ञान भांडवलाचे शतक असे केले जाते. ‘ज्ञान हीच शक्ती आहे, म्हणून ज्ञाननिर्मिती व ज्ञान प्रसारासाठी कार्यक्षम सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेची गरज देशाला असते; परंतु भारतीय चातुर्वर्ण्य परंपरेत ‘शिक्षण ही उच्च वर्णीयांची मक्तेदारी होती व स्त्री-शूद्रातिशूद्र शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित होते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद, सावित्रीबाई, फातिमाबी शेख, कर्मवीर भाऊराव पाटील आदींच्या प्रयत्नांतून शिक्षणाची दारे बहुजन समाजाला उघडली गेली. भारतीय संविधानाने भारतातील बालकाला शिक्षणाचा हक्क दिला. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची संविधानिक जबाबदारी शासनाने काही प्रमाणात उचलली होती.
परंतु १९९० च्या जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण धोरणामुळे गॅट करार, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांच्या धोरणामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे स्वरुप पालटले आहे. भारतातील ‘शिक्षण एका प्रचंड संकटात सापडले आहे. प्रचंड महाग शिक्षण, नफेखोरी, शिक्षणाचा व्यापार, शैक्षणिक विषमता, अभिजनवाद, शिक्षणाची मर्यादित संधी, गुणवत्तेपेक्षा धनसत्तेला महत्त्व, शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण, शैक्षणिक स्वायत्ततेवर आक्रमण इ. समस्यांनी शिक्षणव्यवस्था ग्रस्त आहे.
याचा परिणाम म्हणून बहुजन समाज, स्त्रिया, मुली, अल्पसंख्य कष्टकरी वर्ग शिक्षणातून बाहेर फेकला जात आहे. सरकार जनतेला शिक्षण देण्यास तयार नाही. सरकारी शिक्षणव्यवस्था बंदच पाडून शिक्षणाच्या खासगीकरणाला उत्तेजन देण्याची सरकारची भूमिका आहे. शिक्षण, आरोग्य यासाठी निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे व शिक्षणावरची गुंतवणूक कमी करत नेण्याचे सरकारचे धोरण आहे, याचा परिणाम म्हणून शिक्षण हे पैसेवाल्यांची मक्तेदारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही शिक्षक,पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अशी मागणी करतो की, ‘के.जी. ते पी.जी. सर्व शिक्षण सर्व मुलांना मोफत, समान, गुणवत्तापूर्ण व धर्मनिरपेक्ष जो देईल त्याला आम्ही मते देऊ! फ्रान्स, जर्मनी, फिनलँड, कँडीनेव्हियन देश जे करु शकतात ते भारतात का होऊ शकत नाही?
धोरणात्मक भूमिका :बालवाडी ते उच्च शिक्षण मोफत, समान, गुणवत्तापूर्ण मिळालेच पाहिजे.
शिक्षण खासगी वस्तू (Private Good) न मानता सार्वजनिक वस्तू (Public Good) मानावी.
शिक्षणावर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान ८ टक्के खर्च झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना कर्जबाजारी करणाऱ्याशिक्षण कर्ज योजना बंद झाल्या पाहिजेत व त्याऐवजी मुलांना जादा शिष्यवृत्त्या उपलब्ध झाल्या पाहिजेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या सन २०१५ च्या निर्णयाप्रमाणे परिसर शाळा/समान शाळा स्थापन झाल्या पाहिजेत.
विना अनुदान धोरण रद्द होऊन, सर्व शिक्षण संस्थांना पूर्ण अनुदान मिळाले पाहिजे.
शिक्षणातील खासगीकरण, व्यापारीकरण, नफेखोरी, कंपनीकरण, पी.पी.पी. योजना, जागतिकीकरण त्वरित थांबले पाहिजे.
सरकारी शिक्षण व्यवस्थेतूनच शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होते हा जगभरचा अनुभव आहे म्हणून सरकारी शिक्षणव्यवस्था बळकट झाली पाहिजे.शैक्षणिक विषमता, शिक्षणाचे स्तरीकरण बंद झाले पाहिजे.
शिक्षणाचे उद्दिष्ट मुलांना ‘कुशल कामगार म्हणून तयार करणे हे न ठेवता स्वतंत्र विचार करणारा, संविधानिक मूल्य जोपासणारा नागरिक निर्माण करणे हे असले पाहिजे.
शिक्षण अभ्यासक्रमाचा गाभा हा ‘संविधानिक मूल्य असला पाहिजे.
सर्व मुलांना अंगमेहनतीची कामे व शिक्षण हे अनिवार्य असले पाहिजे. शालेय शिक्षणाचा पाया ‘बुनियादी तालीम’ हा असणे आवश्यक आहे.
दलित, आदिवासी, स्त्रिया यांच्या विरोधात असणारे मनूवादी, पुरुषप्रधान, विषमतावादी, भांडवलवादी, सांप्रदायिक शिक्षण धोरण बदलून समतावादी शिक्षण धोरण तयार झाले पाहिजे.
समाज शिक्षण हे शिक्षण धोरणाचा एक अविभाज्य अंग आहे म्हणून आयुष्यभरचे शिक्षण (लाईफलाँग लर्निंग) यासाठी सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला आवश्यक ते आर्थिक अनुदान व प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
बालशिक्षण :सर्व न्युरोलॉजिस्ट, बालमानसशास्त्रज्ञ असे सांगतात की, बालकाच्या मेंदूचा ९० टक्के विकास हा ०-६ वयातच होतो व पुढच्या आयुष्यात हा विकास केवळ १० टक्के होतो. म्हणून शास्त्रशुद्ध बाल शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शून्य ते तीन वयाच्या बालकांसाठी व त्यांच्या मातांसाठी आरोग्य योजना कार्यक्षम व आधुनिक असल्या पाहिजेत.
वयवर्ष ३-६ चे बालशिक्षण मोफत, गुणवत्तापूर्ण, सक्तीचे व समान असले पाहिजे.
बाल शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षण संचालनालय, नियमावली, आर्थिक तरतूद, प्रशिक्षण या योजना असणे आवश्यक आहे.
उत्कृष्ट दर्जाचे बालशिक्षण सर्व मुलांना मिळेल अशी गुंतवणूक व व्यवस्था सरकारने केली पाहिजे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही शासनाचे बालशिक्षण धोरण नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
प्राथमिक शिक्षण :प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत, समान व गुणवत्तापूर्ण असले पाहिजे.
शाळेला सर्व पायाभूत सोयी चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत.
सर्व मुले शाळेत येतील व ती शाळेत टिकतील हे पाहणे शिक्षण खात्याचे काम असले पाहिजे.
लोकवर्गणी गोळा करणे, शिक्षणबाह्य कामे देणे इ. कामे शिक्षकांना न देता शाळेत शिक्षकाने शिकवण्यावर भर देण्यासाठी त्यांना वेळ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
विद्यार्थी-शिक्षक प्रमाण हे २०:१ असावे.
मुलांना नापास न करता, त्यांचे सातत्यपूर्ण मूल्यांकन केले जावे.
शिक्षक, शिक्षकेतरांच्या सर्व जागा त्वरीत भरल्या जाव्यात.
आदिवासी, भटके, विमुक्त मुली, दिव्यांग, स्थलांतरित कामगारांची मुले, अल्पसंख्याक, ट्रांस जेंडर इ. मुलांना त्यांची संख्या जरी कमी असली तरी त्यांना चांगले शिक्षण मिळण्याचा हक्क आहे व तसे शिक्षण देणे सरकारचे कर्तव्य आहे, त्यासाठी आवश्यक गुंतवणूक झाली पाहिजे.
सर्व मुलांवर श्रमसंस्कार हा शिक्षणातून झाला पाहिजे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण :इयत्ता १२वी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे, मोफत, समान व गुणवत्तापूर्ण असले पाहिजे.
शाळेला उत्कृष्ट पायाभूत सोयी, प्रशिक्षित पुरेसे शिक्षक-शिक्षकेतर नेमले गेले पाहिजे.
शाळांना पुरेसे वेतन व वेतनेतर अनुदान मिळाले पाहिजे.
विद्यार्थी-शिक्षक हे प्रमाण ३५:१ असे असले पाहिजे. यासाठी जादा शिक्षक नेमले गेले पाहिजेत.
इयत्ता ८वी पर्यंत परीक्षा नसावी; पण विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन झाले पाहिजे.
अंगमेहनतीचे व्यवसायशिक्षण सर्व मुलांना दिले गेले पाहिजे.
कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती, जागा रिक्त ठेवणे इ. प्रकार थांबले पाहिजेत.
उच्च शिक्षण :हे शिक्षण सक्तीचे नसले तरी मोफतअसावे.
उच्च शिक्षणाचा ग्रॉस एन्रोलमेंट रेशो हा किमान ५० टक्के असला पाहिजे.
यासाठी जादा महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन करणे आवश्यक आहे.
ही महाविद्यालये सरकारी अनुदानितच असली पाहिजेत.
कंत्राटी पद्धतीने जागा भरणे, पदे रिक्त ठेवणे, विना अनुदानित अभ्यासक्रम चालवायला मान्यता देणे इ. प्रकार थांबायला पाहिजेत.
महाविद्यालये, विद्यापीठे यांची शैक्षणिक स्वायत्तता टिकली पाहिजे. सरकारने त्यावर बंधने टाकण्याचे धोरण अवलंबू नये.
उच्च शिक्षण प्रामुख्याने ‘ज्ञान निर्मिती’करते त्यासाठी संशोधन सुविधा, विद्यावेतन हे संशोधकांना उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.
व्यवसाय प्रशिक्षण याची सोय १२वी नंतरच उपलब्ध करुन दिली पाहिजे.
उच्च शिक्षा आयोग विधेयक, नवा विद्यापीठ कायदा, राष्ट्रीय मेडीकल आयोग विधेयके रद्द केली पाहिजेत व विद्यापीठांचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने झाले पाहिजे.
१३ टक्के रोस्टर पद्धत बंद करुन, संपूर्ण शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या राखीव जागा पूर्ण भरल्या गेल्याच पाहिजेत.
अल्पसंख्यांकांचे शिक्षण :अल्पसंख्यांक समाजात व प्रामुख्याने मुस्लिम समाजात मुलामुलींमध्ये शिक्षणाची इच्छा प्रबळ होत आहे; पण त्यांची आर्थिक, सामाजिक अवस्था अतिशय हालाखीची आहे असे निरीक्षण न्या. सच्चर कमिटीने नोंदवले आहे. म्हणून सच्चर कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे.
मुलामुलीने शिक्षणात व उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात यावे यासाठी शिष्यवृत्ती, प्रोत्साहन योजना चांगल्या प्रकारे असणे आवश्यक आहे.
उर्दूच्या संदर्भात त्रि-भाषा सूत्र अमलात आणावे. शिक्षणाचे माध्यम प्रादेशिक भाषा हिंदी, इंग्रजी असे असावे व सर्व शाळांमध्ये उर्दू ही जादा भाषा म्हणून शिक्षणाची सोय असावी. यामुळे मुस्लिम मुले व मुस्लिमेतर मुलेसुद्धा उर्दू भाषा शिकू शकतील.
मुस्लिम मुलांकडे हुन्नर किंवा व्यवसाय कौशल्य चांगल्या प्रकारे असते त्यामुळे त्यांच्यासाठी व्यवसाय शिक्षणाच्या सोयी ज्यादा उपलब्ध करुन द्याव्यात.
दिव्यांग, आदिवासी, ट्रान्स जेंडर यांचे शिक्षण :अंध, अपंग, मूक-बधीर, मतिमंद, आदिवासी, ट्रान्स जेंडर इ. मुलांच्या शिक्षणाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्या गरजा लक्षात घेऊनच त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली पाहिजे. अशा प्रकारची मुले संख्येनी कमी असली तरी त्यांना पुरेसा निधी उपलब्ध करुन देणे हे कल्याणकारी सरकारचे कर्तव्य आहे.
स्थलांतरित कामगारांची मुले, आदिवासींची मुले, दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी शाळेच्या जवळ राहण्यासाठी चांगल्या प्रकारची वसतिगृहे सर्वत्र सुरु झाली पाहिजेत. तरच हा उपेक्षित विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येईल.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने त्याचे शैक्षणिक धोरण स्पष्ट करावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.
हा जाहीरनामा अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा आणि इतर समविचारी संघटनांनी तयार केला आहेअखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, संघर्ष व प्रबोधन या दोन्ही मार्गांनी शैक्षणिक चळवळ पुढे नेण्यासाठी कार्यरत  आहे.